सहवास असावा हवाहवासा,
नको दुरावा दुःखाचा.
दुःख प्यावे दुधापरीते,
लवलेश नसावा क्लेशाचा.
बंद नसावे द्वार मनाचे,
नात्यांचेही असे तसे.
बंधनात ती भली खुशाली,
नात्यांचेही असे तसे.
विरह न व्हावा कधीही,
ना विरहाची वेदना.
प्रेमाने जग जिंकावे,
चिरतरुण मनी भावना,
दाटुनी येई कंठ ,
बरसेल मेघ न गरजता.
रिचवले कोण हलाहल?
अनुत्तरित तोही विधाता.
भले बुरे जे असे भोवती,
अधुरे असे ते तुझ्याविना,
सप्तसुरांची जमली मैफल,
पण साज चढेना तुझ्याविना.
No comments:
Post a Comment